शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरची स्वच्छता आता रात्री! : पालिके चा निर्णय, स्वप्नाली शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:43 IST

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रात्री पालिकेकडून साफसफाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात रात्री साफसफाई करून रात्रीच सर्व कचरा गोळा करण्यात यावा,

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रात्री पालिकेकडून साफसफाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात रात्री साफसफाई करून रात्रीच सर्व कचरा गोळा करण्यात यावा, अशी मागणी शहरातून होत आहे. या मागणीची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

दिवसेंदिवस महाबळेश्वर येथे भेट देणाºया पर्यटकांची संख्या वाढत आहे. सध्या येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानात सहभाग घेतला आहे. सर्वेक्षणात महाबळेश्वर पालिकेचा ३४ व्या क्रमांकावर पोहोचली असून, प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे हे स्वत: सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील व पालिकेच्या कर्मचाºयांच्या सहकाºयाने शहर स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.

नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत महाबळेश्वरची बाजारपेठ रात्री उशिरा स्वच्छ करण्याचा पालिकेकडून निर्णय घेण्यात आला. अनेकवेळा सफाई करूनदेखील बाजारपेठेत रात्री सर्वत्र अस्वच्छता दिसून येत होती. सकाळी पालिकेची कचरागाडी बाजारपेठेतून लवकर जात असल्याने अनेकवेळा व्यापारी रात्री दुकान बंद करतानाच कचरा बाहेर ठेवत होते. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षांनी रात्रीच बाजारपेठेतील कचरा साफ करण्याचा निर्णय घेतला.

रोज रात्री बारा वाजता येथील बाजारपेठेतून संपूर्ण रस्ता झाडून कचरागाडीत भरला जात असल्याने संपूर्ण बाजारपेठ रात्रीच स्वच्छ होते. सकाळी बाहेर पडणाºयांना व सकाळी बाहेरून दाखल होणाºया पर्यटकांना स्वच्छ शहर पाहण्यास मिळत होते. शहरातील बाजारपेठ रोज स्वच्छ दिसू लागल्याने अनेक नागरिकांनी केवळ बाजारपेठेऐवजी संपूर्ण शहरच रात्री साफ करण्याच्या प्रतिक्रिया शहरातून आल्या. त्यामुळे नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी रात्रीच शहर सफाई करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनाचे काम हाती घेतले. शहरातून ओला व सुका कचरा वेगळा जमा करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा निपटारा लवकर होत आहे.